शनिवार, ८ ऑगस्ट, २०२६

धन्य ते गायनी कळा

धन्य ते गायनी कळा
गायन कलेचे महत्व आणि मानवी आयुष्यातले त्याचे महत्व जाणूनच आपल्या प्राचीन संस्कृतीने गायन कलेला पंचम वेद म्हणून संबोधले आहे. समर्थ रामदास सारख्या संताने पण "धन्य ते गायनी कळा"म्हणून गायन कलेचा गौरव केला आहे.
मराठवाडा आणि देवगिरी म्हणजे संतांचे माहेरघर.जवळच्या पैठण ची ख्याती दक्षिण काशी म्हणून पूर्वापार प्रचलित आहे. वेरूळची लेणी घृ ्णेश्वाराचे मंदिर ,देवगिरीचा किल्ला ,हि महाराष्ट्राची आभूषणे संत संस्कृतीचा वारसा घेऊन औरंगाबाद ,पैठण ,हि शहरे महाराष्ट्राला आणि मराठी संस्कृतीला खुलवतात आहेत.
आज औरंगाबाद च्या एका युवा कलाकाराचा जन्मदिवस आहे ,त्या सुरेल आणि सुरेख कलाकाराला मैत्रायनाच्या हार्दिक शुभेच्छा .
प्राध्यापक राजेश सरकटे आणि त्यांची "स्वर विहार "संस्था माहित नसलेला माणूस शहरात नसावा.आणि नितीनच्या मराठी भावगीतांवर आशिक झाला नाही असा युवक औरंगाबादेत नसावा असलातर कदाचित बहिरा तरी असावा.
नितीतीन सरकटे हे फक्त तरुणाईचेच आवडते नाव नाही तर बुजुर्गांचेही लाडके नाव आहे ,वेरूळ महोत्सवाचे रंग
नितीनच्या दमदार आणि ओजस्वी अवजावाचून रंगतच नाही. नीतींची पंढरीची वारी रंगवणारे गाणे चालू होते तेव्हा वाटते कि तो विठूराया पंढरी सोडून पैठणच्या मार्गावर येतोय त्याच्या वारीला भेटायला ,, आणि नितीन स्वरासाधानेत येवढा मग्न असतो कि त्या बापड्या पांडुरंगाला द्यायला नितीन कडे विटाही नसते. नितीन गातो ते मजा म्हणून नव्हे तर उपासना म्हणून.पितृतुल्य वडील भावाच्या उपासनेचे दृश्यस्वरूप म्हणजे पुत्ररूप नितीनचे सुगम गाणे.
नितीन गाणे सुगम संगीत असते सुगम म्हणजे सगळ्यांना आवडणारे आणि समजणारे.
कलाकार हे परमेश्वराचे दूत असतात ,त्याच्या ब्राम्हस्वरूपाचे गायन ते करतात फक्त मार्ग वेगवेगळे असतात .
ज्या मार्गाने भावाच्या मार्गदर्शना खाली नीतीत गातो ते सर्वांचे गाणे आहे भाषा प्रांत आणि भावनांना ओलांडून जाणारे गाणे.
ह्या गाण्याला कसलेही बंध नाहीत ते मुक्त आहे म्हणूनच सुगम आहे ,सुगम संगीताच्या ह्या देवगिरी बादशाहाला मैत्रायानाचा सलाम.
शशांक रांगणेकर .मुंबई. 

सोमवार, ३ ऑगस्ट, २०२६

देव तारी त्याला कोण मारी

देव तारी त्याला कोण मारी ,असे म्हणतातआणि हा देवाचा आशीर्वाद जर निशब्द येत असेल त्याचे रूप गंध फारच मनोहारी असतात.काही कविता भाषेला संपन्न करतात आणि कवी जनमानसाला.मराठी कविता संपली म्हणणाऱ्या टीकाकारांना मिळालेले एक निशब्द उत्तर जे देवा घरून आले आहे.मराठी कविता अमर आहे अक्षर आहे सांगणारे हे उत्तर.
मराठी कविता हि मराठी माणसाची समाजाची एक हृदयस्थ जिवंत जाणीव,"राकट देश कणखर देश दगडांच्या देशा"म्हंटल्या गेलेल्या देशाचे रूप दिसते हळुवार कवितेत आणि र्या रुपाला रंग देतात कवी.
एक असाच शब्दांना भावांचा रंग देणारा एक कवी निशब्द देव.
अतिशय नाजूक तरीही अत्यंत प्रभावी शब्दात सुख दुक्खाचे मोहर फुलवणारी यांची कविता हि मराठी साहित्याला मिळालेली एक अनमोल भेटच आहे.
 
देवांची कविता जशी नाजूक आहे हळुवार आहे तशीच मानवी अपप्रवृत्तींवर कोरडे ओढणारी हि
आहे.
"गोष्टी नको नकोत्या सांगून लोक गेले ..हि अशीच एक सुन्न करणारी कविता अतिशय थोड्या शब्दात कवीची सल वेदना प्रकट करणारी त्याची कविता थेट वाचकांच्या हृद्याच भिडते.
मानवी जीवन सुख दुक्खांचा एक क्यालीडोस्कोप प्रत्येक धक्क्य बरोबर काचांच्या आकृत्या बदलत असतात.सुख कधी कुठे संपते आणि दुखाची झळ लागत जाते ते काळातही नाही.सुख्दुखाच्या ह्या लहरींवर मानवी जीवन तरंगत असते आणि नेमकी तीच अस्थिरता ह्या कवीच्या कवितेत डोकावून जाते.
ह्या देवांची मला भावलेली एक कविता "म्हणून तू रडली होतीस न आई ,"हा लेख लिहिता लिहिता मला ती वाचायला मिळाली ,लहान मुलाच्या मनातले निरागस दुख्हाचे कढ,देवा रे देवा किरी भन्नाट लिहितो माणूस अगदी फोडां प्रमाणे ठसठसणाऱ्या अगतिकतेकी नेमकी पण निरागस सल.
दाखवतो आणि तरीही तू मला पाहिजे ते सर्व दिल होतस म्हणत समाधानाची साय हि पसरवतो .दुक्खाला शब्दांची झबली चढवणारी ह्याची कविता मातृत्वाचे मंगल स्तोत्र गाते. .आजची श्यामची आई आणि तिचा श्याम आज ह्याच्या कवितेत दिसतो.
ह्याची कविता वाचकालाच निशब्द करते ह्याच्यावर चार शब्द लिहिण्याची ताकतही माझ्या शब्दात नाही हा माझ्झा लेख म्हणजे सूर्याला ओवाळणारी पणतीची ज्योत.निशब्द तुझ्या शब्द प्रभुत्वाची हि एक मैत्रायानाची प्रेमळ पावती समज आणि मान्य करून घे.
शशांक रांगणेकर मुंबई ९८२१४५८६०२

सोमवार, १ डिसेंबर, २०२५

प्रसाद पाध्ये

कलेचं सौंदर्य नेमकं कुठे असतं?
रूपात, नादात, सुरात, स्वरात, शब्दात — की कलाकाराच्या अंतरंगात?
खरं तर, कला ही एक चमत्कारिक शक्ती आहे. परमेश्वराने जेव्हा माणसाला ‘नाद’ ही देणगी दिली, तेव्हा त्यासोबत सुर-तालाची अनुभूती आणि मनाला स्पर्श करणारी संवेदनाही दिली. त्यामुळे कलाकार हा फक्त वादक किंवा गायक नसतो — तो देवाने पाठवलेला अधिरूपाचा दूत असतो.

तबला…
एक केवळ तालवाद्य नाही.
तो गायकाच्या शब्दांना चालना देणारा, संगीताला श्वास देणारा आणि मनाला स्पंदन देणारा नादयोगाचा महामार्ग आहे. गीत कितीही सुंदर असलं, तरी त्याच्या पाठीशी ताल नसला तर नाद फुलत नाही. गाण्याला आयुष्य देणारा ‘स्पंदनाचा श्वास’ म्हणजे तबला.

आणि या स्पंदनाचा खरा साधक म्हणजे — प्रसाद विलास पाध्ये.
स्वच्छ, सात्त्विक आणि सच्च्या स्वरूपात तबला अनुभवणारा हा कलाकार म्हणजे कलेचं एक कोमल रूप. त्याच्या हातातील बोल फक्त नाद निर्माण करत नाहीत; तर श्रोत्याच्या मनात एक दैवी शांतता निर्माण करतात.

कोंकण…
निसर्गाचा निखळ साज.
सुंदर झाडं, पारदर्शक पाऊस, मातीचा मंद सुगंध — या सगळ्यांच्या साक्षीने कोंकणातले कलाकार घडतात. कोंकणात तेज आहे, आणि त्या तेजात कोमलता आहे. या तेजातच प्रसाद पाध्ये यांची कलात्मकता उजळून निघते.

एक गोष्ट सतत जाणवते —
प्रसादला ‘तबला वाजवणं’ हा व्यवसाय नाही; ती त्याची उपासना आहे.
ज्याच्यासाठी नाद म्हणजे देव,
ज्याच्यासाठी ताल म्हणजे श्वास,
ज्याच्यासाठी सृजन म्हणजे साधना—
तो कलाकार केवळ कलाकार राहत नाही; तो नादरूप भक्त बनतो.

जगात शब्दांच्या मर्यादा असतात; पण नादाच्या नाहीत.
जिथे शब्द थांबतात, तिथे तबला बोलायला लागतो.
आणि श्रोत्याच्या मनात शांतता उतरते.

प्रसादच्या हातातील स्पंदन हे फक्त ताल नसतं —
ते ईश्वराची ‘देहपूजा’ आहे.
त्याच्या तालबद्ध बोटांतून वाहणारी प्रत्येक लय ही अंतर्मनाला निवांत करून जाणारी दिव्य अनुभूती आहे.
मैत्रयाण पुनरलेखित 

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२५

ब्लॉग लिंक मदत

https://chatgpt.com/share/67aef969-a358-8008-b2bb-18d5fb8a9762

बुधवार, २९ जानेवारी, २०२५

लेख "मैत्रायण" शशांक रांगणेकर यांनी लिहिला आहे, ज्यात अमेय घरत यांच्या प्रतिभेचा गौरव केला आहे. अमेय हे एक कुशल लेखक, कवी, अभिनेता आणि छायाचित्रकार आहेत. त्यांच्या भाषेवरील प्रेमामुळे त्यांनी अनेक साहित्यप्रकार हाताळले आहेत. त्यांना अभिनयाचीही आवड असून, त्यांनी रंगभूमीवर कार्य केले आहे. लेखात त्यांची आध्यात्मिक जाणीव आणि मानवी स्वभावावरील विचारसुद्धा अधोरेखित केले आहेत. संपूर्ण लेख येथे वाचा: मैत्रायण.

अमेय घरत... ग्रे आकाशातील शुक्रतारा!




शब्दांच्या पलीकडले काय असत?... बरेच काही! त्या सर्व भाव-भावनांना एकत्र आणून शब्दात आणि तेही बहुभाषिक शब्दात गुंफणे आणि जाहिरातीसाठी त्याचा परिणामकारक उपयोग करणे हे फक्त त्यालाच जमते जो मनापासून शब्दांवर आणि माणसांवरही प्रेम करतो.

परमेश्वर हा लहरी चित्रकार असावा म्हणून कधी कधी तो अमेय सारखी चित्र मन लाऊन काढतो अन्यथा माझ्यासारख व्यंगचित्रे काढणे हा त्याचा आवडता छंद. सूर्य आणि चंद्र कधी एकत्र येत नाही म्हणतात. एक उगवतो तेव्हा दुसरा मावळतो. पण अमेयाच्या बाबतीत परमेश्वराने हे हि डावलायचे ठरवलेले दिसत. आड म्हणून तर त्याच्या डोळ्यात दिसते चांदणे आणि चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचा सूर्य. जाहिरातचा धंदा तेजीत असल्याने कदाचित परमेश्वराने त्यात उतरायचे ठरवून आपले मास्टर पिसेस पृथ्वीवर पाठवाचे म्हणून अमेयला पाठवले असावे. पण अमेय म्हणजे नुसतीच जाहिरात नव्हे तर शत प्रतिशत सत्यही. भाषेवरचे त्याचे प्रेम हे एक व्रत आहे. त्यासाठी साहित्याच्या कित्येक प्रांतात त्यांनी शिलेदारी केली आहे. कविता, एकांकिका, जिंगल्स, कथा, लेख अशा अनेक प्रकारांवर आपली अमेय मुद्रा त्यांनी उमटवली आहे.

कुसुमाग्रज जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाशिक येथिल कुसुमाग्रज स्मारकात झालेल्या "नातवांच्या कविता" या कार्यक्रमात सहा नातवांपैकी एक नातू म्हणून त्याने स्वतःच्या कविता सादर केल्या. अभिनय हे ह्याचे दुसरे वेड. देवेंद्र पेम सारख्या सुप्रसिद्ध रंगाकार्मिंकडे ह्यांनी अभिनयाचे धडे घेतले आहेत. भविष्यात एक स्वनिल डोळ्यांचा आणि खुबसुरत चेहऱ्याचा अभिनेता मराठी रंगभूमीवर अथवा टीव्हीवर दिसेल. फोटोग्राफी हा ही त्याचा आवडता छंद. जाहिरातीच्या चंदेरी दुनयेत राहूनही हा युवक जमिनीवर पाय घट्ट रोऊन उभा आहे. 'माणूस' हा ह्याचा आवडता विषय. "विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा." माणसांच्या संगतीत राहून त्यांचे आगळेवेगळेपण हा शोधतो आहे.

आत्मा हे परमात्म्याचे रूप आहे हे ह्याला तरुण वयातही कळले आणि त्याची अनभूती अध्यात्म्याच्या वाटेवर ह्याला येत असते. अध्यात्मिक अनुभूतीला वयाचे बंधन नसते हेच खरे!

अमेय, तुझ्याच शब्दांत सांगायचे झाले तर "चालण्याची दिशा बदलताच डावे उजवे आपोआप बदलते आणि डोईवर केवळ 'ग्रे' आकाश उरते!"

खर आहे, पण माझ्यासाठी त्या आकाशात एक तेजस्वी शुक्रताराही लुकलुकतो आहे... अमेय!





- शशांक रांगणेकर

------------------------------------------------------------------------------------------

शशांक शिरीष केतकरवरील पोस्ट

https://chatgpt.com/share/679a1081-2a14-8008-975e-cff691128743

अनंत हस्ते कमला देता किती घेशील दो …..

अनंत हस्ते कमला देता किती घेशील दो …..
अमेयच्या बाबतीत असाच घडलाय ,परमेश्वराने रूप आणि गुणाची नुसती उधळण केली आहे ,आणि त्याबरोबर सहृदयतेचे लेणे बोनस म्हणून फ्री ,चेहऱ्यावरचे अजातशत्रू भाव हे ह्या निरलासतेचे दृश्य स्वरूप ,,कुठलाही व्यवहारी भाव नाही वैश्य वृत्तीचा पूर्ण अभाव ,आणि चेहऱ्यावर मनातून उमटणारी समाधानी वृत्ती ,परमेश्वरानी दिलेल्या सुखाची पावती चेहयावर फडकावत हा युवक सदैव वावरत असतो ,
सुखी माणसाचा सदरा घालून आलेला अमेय एक आदर्श वाटतो ,,जीवनातले सुखाचे मार्ग तुमचे तुम्हीच शोध ,आणि शोध म्हणजे सापडेल असा संदेश देणारा अमेय अस्पर्शचैतन्याचा अमृत स्पर्श च आहे
शशांक रांगणेकर