शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२५

ब्लॉग लिंक मदत

https://chatgpt.com/share/67aef969-a358-8008-b2bb-18d5fb8a9762

बुधवार, २९ जानेवारी, २०२५

लेख "मैत्रायण" शशांक रांगणेकर यांनी लिहिला आहे, ज्यात अमेय घरत यांच्या प्रतिभेचा गौरव केला आहे. अमेय हे एक कुशल लेखक, कवी, अभिनेता आणि छायाचित्रकार आहेत. त्यांच्या भाषेवरील प्रेमामुळे त्यांनी अनेक साहित्यप्रकार हाताळले आहेत. त्यांना अभिनयाचीही आवड असून, त्यांनी रंगभूमीवर कार्य केले आहे. लेखात त्यांची आध्यात्मिक जाणीव आणि मानवी स्वभावावरील विचारसुद्धा अधोरेखित केले आहेत. संपूर्ण लेख येथे वाचा: मैत्रायण.

अमेय घरत... ग्रे आकाशातील शुक्रतारा!




शब्दांच्या पलीकडले काय असत?... बरेच काही! त्या सर्व भाव-भावनांना एकत्र आणून शब्दात आणि तेही बहुभाषिक शब्दात गुंफणे आणि जाहिरातीसाठी त्याचा परिणामकारक उपयोग करणे हे फक्त त्यालाच जमते जो मनापासून शब्दांवर आणि माणसांवरही प्रेम करतो.

परमेश्वर हा लहरी चित्रकार असावा म्हणून कधी कधी तो अमेय सारखी चित्र मन लाऊन काढतो अन्यथा माझ्यासारख व्यंगचित्रे काढणे हा त्याचा आवडता छंद. सूर्य आणि चंद्र कधी एकत्र येत नाही म्हणतात. एक उगवतो तेव्हा दुसरा मावळतो. पण अमेयाच्या बाबतीत परमेश्वराने हे हि डावलायचे ठरवलेले दिसत. आड म्हणून तर त्याच्या डोळ्यात दिसते चांदणे आणि चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचा सूर्य. जाहिरातचा धंदा तेजीत असल्याने कदाचित परमेश्वराने त्यात उतरायचे ठरवून आपले मास्टर पिसेस पृथ्वीवर पाठवाचे म्हणून अमेयला पाठवले असावे. पण अमेय म्हणजे नुसतीच जाहिरात नव्हे तर शत प्रतिशत सत्यही. भाषेवरचे त्याचे प्रेम हे एक व्रत आहे. त्यासाठी साहित्याच्या कित्येक प्रांतात त्यांनी शिलेदारी केली आहे. कविता, एकांकिका, जिंगल्स, कथा, लेख अशा अनेक प्रकारांवर आपली अमेय मुद्रा त्यांनी उमटवली आहे.

कुसुमाग्रज जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाशिक येथिल कुसुमाग्रज स्मारकात झालेल्या "नातवांच्या कविता" या कार्यक्रमात सहा नातवांपैकी एक नातू म्हणून त्याने स्वतःच्या कविता सादर केल्या. अभिनय हे ह्याचे दुसरे वेड. देवेंद्र पेम सारख्या सुप्रसिद्ध रंगाकार्मिंकडे ह्यांनी अभिनयाचे धडे घेतले आहेत. भविष्यात एक स्वनिल डोळ्यांचा आणि खुबसुरत चेहऱ्याचा अभिनेता मराठी रंगभूमीवर अथवा टीव्हीवर दिसेल. फोटोग्राफी हा ही त्याचा आवडता छंद. जाहिरातीच्या चंदेरी दुनयेत राहूनही हा युवक जमिनीवर पाय घट्ट रोऊन उभा आहे. 'माणूस' हा ह्याचा आवडता विषय. "विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा." माणसांच्या संगतीत राहून त्यांचे आगळेवेगळेपण हा शोधतो आहे.

आत्मा हे परमात्म्याचे रूप आहे हे ह्याला तरुण वयातही कळले आणि त्याची अनभूती अध्यात्म्याच्या वाटेवर ह्याला येत असते. अध्यात्मिक अनुभूतीला वयाचे बंधन नसते हेच खरे!

अमेय, तुझ्याच शब्दांत सांगायचे झाले तर "चालण्याची दिशा बदलताच डावे उजवे आपोआप बदलते आणि डोईवर केवळ 'ग्रे' आकाश उरते!"

खर आहे, पण माझ्यासाठी त्या आकाशात एक तेजस्वी शुक्रताराही लुकलुकतो आहे... अमेय!





- शशांक रांगणेकर

------------------------------------------------------------------------------------------

शशांक शिरीष केतकरवरील पोस्ट

https://chatgpt.com/share/679a1081-2a14-8008-975e-cff691128743

अनंत हस्ते कमला देता किती घेशील दो …..

अनंत हस्ते कमला देता किती घेशील दो …..
अमेयच्या बाबतीत असाच घडलाय ,परमेश्वराने रूप आणि गुणाची नुसती उधळण केली आहे ,आणि त्याबरोबर सहृदयतेचे लेणे बोनस म्हणून फ्री ,चेहऱ्यावरचे अजातशत्रू भाव हे ह्या निरलासतेचे दृश्य स्वरूप ,,कुठलाही व्यवहारी भाव नाही वैश्य वृत्तीचा पूर्ण अभाव ,आणि चेहऱ्यावर मनातून उमटणारी समाधानी वृत्ती ,परमेश्वरानी दिलेल्या सुखाची पावती चेहयावर फडकावत हा युवक सदैव वावरत असतो ,
सुखी माणसाचा सदरा घालून आलेला अमेय एक आदर्श वाटतो ,,जीवनातले सुखाचे मार्ग तुमचे तुम्हीच शोध ,आणि शोध म्हणजे सापडेल असा संदेश देणारा अमेय अस्पर्शचैतन्याचा अमृत स्पर्श च आहे
शशांक रांगणेकर


शशांक शिरीष केतकर

 
आज आकाशात बरेचसे ढग दाटून आले आहेत ,तृषार्त चातका प्रमाणे सर्व जण पावसाची वाट पाहताहेत ,फेस बुक हि आमची खिडकी झाली आहे ,ह्या खिडकी तून बाहेरचे वारे येतात आणि जगात काय चालले आहे आहे ह्याची जाणीव करून देतात. म्हंटला बघूया फेस बुक वरचा पाऊस काय म्हणतोय .सर्फ करता करता एका कलाकाराचे प्रोफाईल नजरेत पडले ,शशांक केतकर ह्याचे आणि नावात साम्य असल्याने ते पूर्णपणे पाहण्याचा मोहही आवरला नाही.

एक अतिशय सुंदर आणि सोप्प्या शब्दात गुंफलेले चारच ओळींची कविता होती,"बोलले मेघ हे सारे अन बोलले थेंब रे ...........
अतिशय तरल शब्दात पावसाच्या चाहुलीची भावपूर्ण कुजबुज सांगणारी हि कविता मनापासून भावली.
प्रोफाईल ची सफर चालूच होती ,आणि तिळा उघड म्हणताच उघडणारी अलिबाबा ची गुहा उघडली.
केवळ चकचकीत चेहरा असलेला हा रंगकर्मी नाही तर सामाजिक संवेदानाचे भान ठेवणारा ,मनात कविता जपणारा आणि फुलवणारा एक संवादशील कलाकार आहे.
चेहऱ्यावर चमकणारे बुद्धिमत्तेचे तेज आणि डोळ्यात ओथंबणारे माणुसकीचे मेघ.आणि प्रसन्ना व्यक्तिमत्वाचे गुलाबी वलय. छोट्या पडद्यावरचे एक मोठे उदयोन्मुख आगमन.
मी सहसा मालिका बघत नाही कारण त्यात दिसणाऱ्या व्यक्ती मला अनोळखी वाटतात ,चांगुलपणा आणि दुष्टपणा ह्याची सीमा गाठणारी व्यक्तिमत्व अजूनतरी परमेश्वर कृपेने माझ्या भेटीला आलेली नाहीत. पण शशांक काम करत असेलेली सिरीयल थोडा वेळका होईना त्याच्या उपस्तिथी मुले सुसह्य वाटते. एक संयत अभिनयाचे दर्शन होते.

शशांक ने अभिमानाने आपण जोपासलेल्या झाडाच्या आंब्याचे फोटो भिंतीवर टाकले आहेत.मातीशी नाते सांगणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व सिरीयल च्या कचकडी जगात राहूनही स्वतःच्या श्रमाने मोहरणारे अनोखे रूप.

ज्ञान कोशकार केतकर महाराष्ट्रातले एक धीमंत व्यक्तिमत्व ,शशांक हि त्या बुद्धीचा वारसा ठेऊनच आहे.सेलिब्रेटी आणि त्यांचे समाजकार्य ह्यावरचे त्याचे भाष्य त्याच्या निरक्षण क्षमता आणि अचूक भाष्य हे ह्याची ठळक ओळख देतात.
शशांक एक लोकप्रिय कलाकार आहे ,पण तरीही त्याच्या कला गुणांना पुरेसा वाव मिळत नाही आहे हि खंत मनात कुठेतरी सालात राहते ,कदाचित त्याचे व्यक्तिमत्व पेलवेल अश्या भूमिका सिरीयल निर्मात्यांकडे नसाव्यात का.अभिनय उच्चारण आणि प्रसन्ना व्यक्तिमत्व लाभलेल्या ह्या गुणी कलाकार ह्या छोट्या पडद्याला पेलवत नाही कि उमगत हेच नाही कळत .
नाही.
शशांकाचे पूर्ण प्रोफाईल मी पहिले आनंद वाटला मराठी कलाक्षेत्राला एक सुसंस्कृत बुद्धिमान लोभस आणि तेजस्वी वाक्तीमात्वा नियती भेट म्हणून देते आहे आणि छोट्या पडद्यावरच्या बड्या बुजुर्गांनी ह्या नावागाताच्या दैवी देणगीचा लाभ घेऊन त्याला आणि ह्या छोट्या पडद्यालाही मोठे बनवावे सर्वार्थाने.
मनात डोकावणारा एक अनाहूत विचार "मी ह्या व्यक्तीला ओळखतही नाही तरीही मला ह्याच्या बद्दल चार शब्द लिहावेसे का वाटले उत्तर आले ते दैवी गुण बुद्धीचे रूपाचे आणि माणुसकीचे त्यांना तू पूर्ण ओळखतोस ना ते ह्याचात दिसले आणि त्यंनी घातलेल्या सादेचा हा प्रतिसाद असावा आणि काय.
शशांक शिरीष केतकर ह्या व्यक्तीलाच नव्हे तर व्यक्तिमत्वाला मैत्रायाणाच्या हार्दिक शुभेच्छा
शशांक रांगणेकर
मुंबई
९८२१४५८६०२

बुधवार, १५ जानेवारी, २०२५

मित्रांचे रामायण

सुरज उतेकर

..

एका राजाची गोष्ट सांगतात कि त्याला काय त्रास होतोय तेच कळेना ,औषध लागू पडेना,काहीही रुचेना ,सतत अस्वस्थ वाटत राहायचे ,राजाच तो सर्व वैद्य आले ,हकीम आले अंगारे धुपारे झाले ,पण कुठल्याही उपचाराने उतारच पडेना नवस सायासही झाले नाना प्रकारचे औशोधोपचार झाले देवानाही वेठीला धरले गेले पण तेही सगळे सार्वजनिक सुट्टीवर गेलेले राजाला काय होतंय तेच काळात नव्हतं ,चेहऱ्यावरचे हसू कायमचे लोपले होत ,




एक कुठूनसा साधू तिथे आला ,त्यांनी मात्र एक सोपा उपाय सांगितला ,"राजा तुझ्या रोगावर एकाच उपाय,तो म्हणजे सुखी माणसाचा सदरा ,तो फक्त तीन दिवस घाल कायमचा सुखी होशील ,,पण तो खरोखरीच्या सुखी माणसाचा सदरा पाहिजे ,नाही तुझ्या आणि देणारयाच्या दुक्खात भर पडेल असे सांगून साधू पावला

मग काय सोप्पा उपाय सापडल्याचे वाटून सर्वत्र आनंदी अनाद झाला ,सुखी माणसाचा सदरा घातला कि त्यांचा राजा आणि त्या बरोबर प्रजाही सुखी होणार होती ,युद्ध पातळीवर सुखी माणसाच्या सदरयाची शोधाशोध सुरु झाली ,आज जर ती झाली असती तर राजाला सुखी माणसाचा सदरा मिळाला असता आणि राजा सुखी झाला असता ,,त्यावेळेच्या सुखी असलेल्या माणसाकडे सदराच नव्हता आजच्या एका माणसाकडे मात्र सदरा असूनही तो सुखी आहे आणि नसूनही तो दुख्ही झाला नसता,ह्याची मला खात्री आहे ,राजाला सुखी माणसाचा नाव मी दिले असते आणि पत्ताही सांगितला असता ,सांगितले असते कि अम्बिवालीच्या माझ्या मित्राकडे "सुरज उतेकर"कडे जा तिथे तुला सुखी माणसाचा सदरा मिळेल .


सुरज उतेकर माझा छोटा मित्र छोटा म्हणायचे कारण एकच त्याचे वय, माझ्यापेक्षा कित्येक दशकांनी नंतर   जन्माला आलेला हा माणूस साहित्याची जाण  जन्माला      येतानाच बरोबर घेऊन  आलाय कि काय कळत नाही,  मला तर वाटते हि पूर्व जन्माची कमाई असावी , नाहीतर वयाचे आणि त्याच्या साहित्त्यिक अनुभूतीचे गणितच  जमत नाही.
हा मुलगा काय करत नाही ,अत्यंत प्रतिकूल परीस्तीतीत शिकतोय ,नोकरी ,करतोय ,लिहितोय कविता करतोय आणि साहित्याची नवीन नवीन शिखरे पादाक्रांत करताना महाराष्ट्रातले डोंगर पालथे घालतोय .आणि हे सर्व करताना क्लेशांची पुसटशी रेषाही त्याच्या चेहऱ्यावर उमटत नाही.


करताना महाराष्ट्रातले डोंगर पालथे घालतोय .आणि हे सर्व करताना क्लेशांची पुसटशी रेषाही त्याच्या चेहऱ्यावर उमट कवी मनाच्या ह्या मुलाला देवी शारदेने मात्र मुक्त हस्ताने शब्द संपत्तिचे वरदान दिले आहे

तरला भावनांना शब्द कोशात कसे बांधायचे ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुरजची कविता

सुख दुखः हे जणू शब्दरूप घेऊन ह्याच्या कवितेत अलगद उतरतात आणि भाव भावनाची महिरप वाचकाह्याच्याच शब्दात ह्याला दाखवावे लागेल त्याचेच शब्द उसने घेऊन कारण माझ्या दुबळ्या आणि फाटक्या झोळीत ते शब्द नाहीत.

त्याशब्दांशी खेळण्याचा

छंद आगळा जडलाय....

तेव्हापासून दुःखाशी

सूर चांगला जुळलाय..