Sunday, February 12, 2012

सुरज उतेकर

..

एका राजाची गोष्ट सांगतात कि त्याला काय त्रास होतोय तेच कळेना ,औषध लागू पडेना,काहीही रुचेना ,सतत अस्वस्थ वाटत राहायचे ,राजाच तो सर्व वैद्य आले ,हकीम आले अंगारे धुपारे झाले ,पण कुठल्याही उपचाराने उतारच पडेना नवस सायासही झाले नाना प्रकारचे औशोधोपचार झाले देवानाही वेठीला धरले गेले पण तेही सगळे सार्वजनिक सुट्टीवर गेलेले राजाला काय होतंय तेच काळात नव्हतं ,चेहऱ्यावरचे हसू कायमचे लोपले होत ,




एक कुठूनसा साधू तिथे आला ,त्यांनी मात्र एक सोपा उपाय सांगितला ,"राजा तुझ्या रोगावर एकाच उपाय,तो म्हणजे सुखी माणसाचा सदरा ,तो फक्त तीन दिवस घाल कायमचा सुखी होशील ,,पण तो खरोखरीच्या सुखी माणसाचा सदरा पाहिजे ,नाही तुझ्या आणि देणारयाच्या दुक्खात भर पडेल असे सांगून साधू पावला

मग काय सोप्पा उपाय सापडल्याचे वाटून सर्वत्र आनंदी अनाद झाला ,सुखी माणसाचा सदरा घातला कि त्यांचा राजा आणि त्या बरोबर प्रजाही सुखी होणार होती ,युद्ध पातळीवर सुखी माणसाच्या सदरयाची शोधाशोध सुरु झाली ,आज जर ती झाली असती तर राजाला सुखी माणसाचा सदरा मिळाला असता आणि राजा सुखी झाला असता ,,त्यावेळेच्या सुखी असलेल्या माणसाकडे सदराच नव्हता आजच्या एका माणसाकडे मात्र सदरा असूनही तो सुखी आहे आणि नसूनही तो दुख्ही झाला नसता,ह्याची मला खात्री आहे ,राजाला सुखी माणसाचा नाव मी दिले असते आणि पत्ताही सांगितला असता ,सांगितले असते कि अम्बिवालीच्या माझ्या मित्राकडे "सुरज उतेकर"कडे जा तिथे तुला सुखी माणसाचा सदरा मिळेल .


सुरज उतेकर माझा छोटा मित्र छोटा म्हणायचे कारण एकच त्याचे वय, माझ्यापेक्षा कित्येक दशकांनी नंतर   जन्माला आलेला हा माणूस साहित्याची जाण  जन्माला      येतानाच बरोबर घेऊन  आलाय कि काय कळत नाही,  मला तर वाटते हि पूर्व जन्माची कमाई असावी , नाहीतर वयाचे आणि त्याच्या साहित्त्यिक अनुभूतीचे गणितच  जमत नाही.
हा मुलगा काय करत नाही ,अत्यंत प्रतिकूल परीस्तीतीत शिकतोय ,नोकरी ,करतोय ,लिहितोय कविता करतोय आणि साहित्याची नवीन नवीन शिखरे पादाक्रांत करताना महाराष्ट्रातले डोंगर पालथे घालतोय .आणि हे सर्व करताना क्लेशांची पुसटशी रेषाही त्याच्या चेहऱ्यावर उमटत नाही.


करताना महाराष्ट्रातले डोंगर पालथे घालतोय .आणि हे सर्व करताना क्लेशांची पुसटशी रेषाही त्याच्या चेहऱ्यावर उमट कवी मनाच्या ह्या मुलाला देवी शारदेने मात्र मुक्त हस्ताने शब्द संपत्तिचे वरदान दिले आहे

तरला भावनांना शब्द कोशात कसे बांधायचे ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुरजची कविता

सुख दुखः हे जणू शब्दरूप घेऊन ह्याच्या कवितेत अलगद उतरतात आणि भाव भावनाची महिरप वाचकाह्याच्याच शब्दात ह्याला दाखवावे लागेल त्याचेच शब्द उसने घेऊन कारण माझ्या दुबळ्या आणि फाटक्या झोळीत ते शब्द नाहीत.

त्याशब्दांशी खेळण्याचा

छंद आगळा जडलाय....

तेव्हापासून दुःखाशी

सूर चांगला जुळलाय..


No comments: