Friday, May 11, 2012

वैद्यराज सुशांत पाटील

वैद्यराज सुशांत पाटील
लहानपणी ऐकलेले एक गाणे आठवले ,भोंडल्याचा फेर घेत घेत मुली म्हणायच्या "कोणी बोलवा माझ्या माहेरच्या वैद्याला ,हातात काठी पंचरंगी .तोंडात विडा केशराचा ,वैद्यराज चे हेच रूप माहित होते ,नाहीतर मुंबई शहरात रोग निवारणाचे काम डॉक्टरच करायचे ,निळ्या रंगाच्या बाटलीत प्रवाही औषध मिळायचे ,शक्य तो गोळ्या नसायच्या ,औषधाचा रंग लाल असायचा आणि त्या मुळे मुलांना तो फार आवडायचा रोग हि फार थोडेच असायचे सर्दी ,खोकला,ताप किंवा अपचन ह्या यादी पुढे यादी नसायची ,कधीतरी तय्फोड ,गालगुंड हि मंडळी भेटीला यायची पण बहुतेक रोग आमच्या डॉक्टर फाल्निकारांच्या आटोक्यात ले असत ,त्यांच्या दवाखाना ह्या पाटी खालील खोलीचा दरवाजा उघडून आत गेले कि अर्धे रोग निवारण व्हायचे आणि उरलेले डॉक्टरांच्या चेहऱ्यावरच्या आपुलकीच्या भावाने व्हायचे ,स्पेशयालीस्त  नसलेल्या जगात आमचे फ्यामिली डॉक्टरच आमच्या योग क्षेमाचा भार परमेश्वरा बरोबर वाहायचे ,लहानपण आणि फ्यामिली डॉक्टर ह्या दोन्ही गोष्टी एकदमच संपल्या ,आणि रोगांची चलति वाढली.
झुलत्या दरवाजाचे दवाखाने वातानुकुलीत चेम्बर मध्ये परवर्तीत झाले आणि फी बरोबर चिकित्सा हि वाढू लागल्या ,.
मुंबईला वैद्यराज फारसे माहित नव्हते ,पण खेडोपाड्यात मात्र आजीबाई च्या बटाव्यापासून वैद्य बुवांच्या काढे चाटण भस्म ग्रामीण जनतेला माहित होते ,पण आताच्या दहा वर्ष्यात आयुर्वेद ,पंच कर्मे ,आणि आयुर्वेदिक चिकित्सा आणि उपचार पद्धतीचा उपयोग शहरातही होऊ लागला आहे आपल्या आयुर्वेदिक चिकित्सा आणि उपचार पद्धतीला देशात आणि परदेशात मान्यता आणि लोकप्रियता मिळत आहे.आणि त्या मागे उभे आहेत अनेक आयुर्वेदिक संस्थाने घेतलेले अथक परिश्रम .शरीरा बरोबर मनाचे आरोग्य हा संदेश देणारे आयुर्वेदिक उपचार कमालीचे लोकप्रिय होत आहेत .वैद्याबुवांचे परिवर्तन वैद्याराजात होणारा प्रवास ह्या अथक परिश्रमाचा दृश्य सोबती सांगाती आहे.

आयुर्वेदाचार्य सुशांत पाटील ,एक आगळे वेगळे व्यक्तीमत्व ,अश्विनीकुमारा सारखे पुरुषी सौंदर्याचे वरदान प्राप्त झालेला हा युवक रोगांचे निवारण करताना त्याच्या निरोगी आणि आश्वासक व्यक्तिमत्वाचे औषध म्हणून नक्कीच उपयोग करत असणार ,अर्धे रोग ह्याच्या चेहऱ्यावर फुलणाऱ्या चांदण्यानेच दूर होत असावेत .चंद्र प्रकाशात रोग निवारण होते हा एक संकेत आहे..
ह्याचे मनोगत वाचून कळते कि हा युवक केवढ्या टोलेजंग उंचीचा आहे ,आणि नुसतीच उंची नव्हे तर ह्याच्या माणुसकीची मुळे किती खोलवर पोहचली आहेत. आयुर्वेदाचा उपयोग केवळ व्यावसायासाठी नव्हे तर "बहुजन हिताय बहुजन सुखाय"करण्यासाठी असतो ह्या वर आणि आपल्या माता पित्यांवर आणि गुरु जनांवर अगाढ श्रद्धा ठेऊन वैदकी करणारा युवक खरोखर प्रशंसेस पात्र आहे.
आयुष्दार्पण सारख्या त्रैमासिकातून वैद्यराज एक सामाजिक चालवलाच चालवतात ,स्त्रीभ्रूण हत्या ,वृक्ष तोड ,बाल मजुरी ,वनसंपदा आणि संवर्धन अश्या अनेक विषयांवर समाज प्रबोधनाचे कार्य वेगवेगळ्या व्यासपीठांवर करतात .आयुर्वेद जनसामान्यानसाठी हे त्यांचे ध्येय आहे .
सहसा वैद्य औषधे सांगत नाहीत पण सुशांत मात्र कुठल्याही माध्यमातून औषधे सांगतो ,कारण त्याच्या मनात असलेले सामाजिक बांधिलकी वरचे प्रेम आणि आयुर्वेदावरची श्रद्धा .
सुशांत चे व्यक्तिमत्व नुसतेच सुधृढ नाही तर सुगंधीही आहे रसिकता ,चोखंदळ वृत्ती ,बहुश्रुत वैविध्यपूर्ण ज्ञान पिपासा हि त्याच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे सप्तरंगी पैलू.
चंद्रप्रकाशात रोगांचे निवारण होये असा एक संकेत आहे त्या संकेताचे दृश्य रूप सुशांतच्या चेहरावर फुलणारे अल्लाहाद्दाई चांदणे आरोग्याचे ,सौदाहार्याचे आणि माणुसकी वरच्या प्रेमाचे ,त्या चांदण्याला मैत्रायानाचे शुभेच्छा पूर्वक अभीवादन
शशांक रांगणेकर
मुंबई ९८२१४५८६०२

No comments: