Monday, June 18, 2012

धन्य ते गायनी कळा

धन्य ते गायनी कळा
गायन कलेचे महत्व आणि मानवी आयुष्यातले त्याचे महत्व जाणूनच आपल्या प्राचीन संस्कृतीने गायन कलेला पंचम वेद म्हणून संबोधले आहे. समर्थ रामदास सारख्या संताने पण "धन्य ते गायनी कळा"म्हणून गायन कलेचा गौरव केला आहे.
मराठवाडा आणि देवगिरी म्हणजे संतांचे माहेरघर.जवळच्या पैठण ची ख्याती दक्षिण काशी म्हणून पूर्वापार प्रचलित आहे. वेरूळची लेणी घृ ्णेश्वाराचे मंदिर ,देवगिरीचा किल्ला ,हि महाराष्ट्राची आभूषणे संत संस्कृतीचा वारसा घेऊन औरंगाबाद ,पैठण ,हि शहरे महाराष्ट्राला आणि मराठी संस्कृतीला खुलवतात आहेत.
आज औरंगाबाद च्या एका युवा कलाकाराचा जन्मदिवस आहे ,त्या सुरेल आणि सुरेख कलाकाराला मैत्रायनाच्या हार्दिक शुभेच्छा .
प्राध्यापक राजेश सरकटे आणि त्यांची "स्वर विहार "संस्था माहित नसलेला माणूस शहरात नसावा.आणि नितीनच्या मराठी भावगीतांवर आशिक झाला नाही असा युवक औरंगाबादेत नसावा असलातर कदाचित बहिरा तरी असावा.
नितीतीन सरकटे हे फक्त तरुणाईचेच आवडते नाव नाही तर बुजुर्गांचेही लाडके नाव आहे ,वेरूळ महोत्सवाचे रंग
नितीनच्या दमदार आणि ओजस्वी अवजावाचून रंगतच नाही. नीतींची पंढरीची वारी रंगवणारे गाणे चालू होते तेव्हा वाटते कि तो विठूराया पंढरी सोडून पैठणच्या मार्गावर येतोय त्याच्या वारीला भेटायला ,, आणि नितीन स्वरासाधानेत येवढा मग्न असतो कि त्या बापड्या पांडुरंगाला द्यायला नितीन कडे विटाही नसते. नितीन गातो ते मजा म्हणून नव्हे तर उपासना म्हणून.पितृतुल्य वडील भावाच्या उपासनेचे दृश्यस्वरूप म्हणजे पुत्ररूप नितीनचे सुगम गाणे.
नितीन गाणे सुगम संगीत असते सुगम म्हणजे सगळ्यांना आवडणारे आणि समजणारे.
कलाकार हे परमेश्वराचे दूत असतात ,त्याच्या ब्राम्हस्वरूपाचे गायन ते करतात फक्त मार्ग वेगवेगळे असतात .
ज्या मार्गाने भावाच्या मार्गदर्शना खाली नीतीत गातो ते सर्वांचे गाणे आहे भाषा प्रांत आणि भावनांना ओलांडून जाणारे गाणे.
ह्या गाण्याला कसलेही बंध नाहीत ते मुक्त आहे म्हणूनच सुगम आहे ,सुगम संगीताच्या ह्या देवगिरी बादशाहाला मैत्रायानाचा सलाम.
शशांक रांगणेकर .मुंबई. 

1 comment:

RAVINDRA said...

This has provoked me to listen to him now.... will do that soon !!
Ravindra Waghmare