सोमवार, २५ जून, २०१२

देव भावाचा भुकेला

देव भावाचा भुकेला
निशब्द देव मराठी कवितेला पडलेले एक भाव गर्भ स्वप्न,मनात आलेल्या भावनांना शब्दांचे रंगरूप देऊन रसिकांच्या मनापर्यंत पोहचविण्याचे काम हे कवीचे काम ,आणि निशब्द हा शत प्रती शत कवी आहे. अतिशय थोडक्या शब्दात जास्तीत जास्त भाव व्यक्त करणे हे उत्तम कवितेचे आदिस्वरूप.निशब्द ह्या कलेत पारंगत आहे.
जीवन चढ उतारांच्या सापशिडी च्या पटावरमुद्रांकित केलेले असते.सुख दुक्ख ,आहेरे नाहीरे ,उन्हा पाउस,जन्म मृत्यू ,अश्या अनेक उलट अर्थी शब्दांची ओळख होताच जाते ,त्यातून पाझरणारे भाव शब्दांच्या जवळपास पोहचतात पण कधीकधी ह्या दोन टोकांच्या मध्ये होणारी घुसमट मात्र निशब्द असते ,आणि देव त्या घुसमटीला अचूक शब्दांच्या पकडीत पकडतात आणि वाचका पर्यंत पोहचवतात ,जळणाऱ्या ज्वालेला शब्दात रंगवता येते पण धुमसणाऱ्या घुसमटीला शब्दांचा टाहो फोडणे फार कठीण आणि देवाच्या कवितेत नेमके तेच सामर्थ्य आहे ,निश्श्ब्द असूनही अतिशय बोलकी अशी हि देवांची बोलकी कविता केशवसुतांच्या "झपूर्झा गडे झपूर्झा"ह्या कवितेशी जवळीक साधणारी वाटते.
आभाळा एवढे दुक्ख दोन ओळीच्या कवितेत मांडण्याचे आणि त्यायोगे अनुचित राजकारणावर दोनच ओळीचे काव्य आसुडा प्रमाणे ओढणारी
त्यांची कविता जेव्हा "चांगले गुण होते पण जातीने गोंधळ केला म्हणते "तेव्हा मंडलआयोग आणि त्यानंतरचे अजूनही धुमसणारे जळीत उभे राहते.
देवांची कविता हि सर्वगामी आहे ,व्यक्ती पासून समष्टी पर्यंत पोहचणारी ,दुक्खाचे पापुद्रेन पापुद्रे सैल करणारी आणि आणि सुखकर तुझा प्रवास विठ्ठला म्हणत आध्यात्य्म्याच्या अबोल मुक्तीला स्पर्श करणारी कविता.
देवांची कविता काम क्रोध मद मोह मत्सर ह्या सर्व मानवी गुण अवगुणाचे चित्रणही फार छान करते.कारण कल्पनेचे पंख लाऊन फिरणाऱ्या ह्या कवीचे पाय मात्र वास्तवाच्या मातीत घट्ट रोवलेले आहेत.
देवांची कविता आणि तिचा अर्थ म्हणजे सतत वाहत जाणाऱ्या आणि पात्र बदलणाऱ्या नदीचे चित्रण शब्दात न पकडता येण्या जोगे ,शब्दांच्या कवेत दुक्खला कवलानारी आणि अर्थाच्या रंगात सुखाला रंगवणारी.देवांची कविता ,निशब्द देवाची बोलाकेच नव्हे तर अबोल करणारी हि कविता एकून म्हणावसे वाटते "देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो."सूर्य किरणासारखी स्वच्छ आणि लखलखीत पसरणारी आणि आभाळ माये सारखी बरसणारी देवांची कविता आणि निशब्द देव ह्यांना मैत्रायानाचे सलाम .
शशांक रांगणेकर
मुंबई
९८२१४५८६०२

सोमवार, १८ जून, २०१२

धन्य ते गायनी कळा

धन्य ते गायनी कळा
गायन कलेचे महत्व आणि मानवी आयुष्यातले त्याचे महत्व जाणूनच आपल्या प्राचीन संस्कृतीने गायन कलेला पंचम वेद म्हणून संबोधले आहे. समर्थ रामदास सारख्या संताने पण "धन्य ते गायनी कळा"म्हणून गायन कलेचा गौरव केला आहे.
मराठवाडा आणि देवगिरी म्हणजे संतांचे माहेरघर.जवळच्या पैठण ची ख्याती दक्षिण काशी म्हणून पूर्वापार प्रचलित आहे. वेरूळची लेणी घृ ्णेश्वाराचे मंदिर ,देवगिरीचा किल्ला ,हि महाराष्ट्राची आभूषणे संत संस्कृतीचा वारसा घेऊन औरंगाबाद ,पैठण ,हि शहरे महाराष्ट्राला आणि मराठी संस्कृतीला खुलवतात आहेत.
आज औरंगाबाद च्या एका युवा कलाकाराचा जन्मदिवस आहे ,त्या सुरेल आणि सुरेख कलाकाराला मैत्रायनाच्या हार्दिक शुभेच्छा .
प्राध्यापक राजेश सरकटे आणि त्यांची "स्वर विहार "संस्था माहित नसलेला माणूस शहरात नसावा.आणि नितीनच्या मराठी भावगीतांवर आशिक झाला नाही असा युवक औरंगाबादेत नसावा असलातर कदाचित बहिरा तरी असावा.
नितीतीन सरकटे हे फक्त तरुणाईचेच आवडते नाव नाही तर बुजुर्गांचेही लाडके नाव आहे ,वेरूळ महोत्सवाचे रंग
नितीनच्या दमदार आणि ओजस्वी अवजावाचून रंगतच नाही. नीतींची पंढरीची वारी रंगवणारे गाणे चालू होते तेव्हा वाटते कि तो विठूराया पंढरी सोडून पैठणच्या मार्गावर येतोय त्याच्या वारीला भेटायला ,, आणि नितीन स्वरासाधानेत येवढा मग्न असतो कि त्या बापड्या पांडुरंगाला द्यायला नितीन कडे विटाही नसते. नितीन गातो ते मजा म्हणून नव्हे तर उपासना म्हणून.पितृतुल्य वडील भावाच्या उपासनेचे दृश्यस्वरूप म्हणजे पुत्ररूप नितीनचे सुगम गाणे.
नितीन गाणे सुगम संगीत असते सुगम म्हणजे सगळ्यांना आवडणारे आणि समजणारे.
कलाकार हे परमेश्वराचे दूत असतात ,त्याच्या ब्राम्हस्वरूपाचे गायन ते करतात फक्त मार्ग वेगवेगळे असतात .
ज्या मार्गाने भावाच्या मार्गदर्शना खाली नीतीत गातो ते सर्वांचे गाणे आहे भाषा प्रांत आणि भावनांना ओलांडून जाणारे गाणे.
ह्या गाण्याला कसलेही बंध नाहीत ते मुक्त आहे म्हणूनच सुगम आहे ,सुगम संगीताच्या ह्या देवगिरी बादशाहाला मैत्रायानाचा सलाम.
शशांक रांगणेकर .मुंबई. 

बुधवार, १३ जून, २०१२

दोन समांतर रेषा कायम बरोबर धावणाऱ्या


दोन समांतर रेषा कायम बरोबर धावणाऱ्या
हे चौगुले आणि आम्ही गणपुले सक्खे शेजारी
हो हो अगदी सक्खे, चाळीस वर्षे आमच्या शेजारी राहतात अगदी प्रेमाने राहतो आम्ही दोन घरात काय ती एक भिंत नाहीतर दोनीही घरे एकाच .अगदी खर नाहीतर एकाच घर
ह्याची पोर माझ्याघरी कायम चरतात घर एकाच वाटेल .नाही तर काय  इति चौगुले
चाळीस वर्षे माझा धर्म बुडतोय माझी पोरे बाटाताहेत धाकटा अभक्ष भक्षण करतो इति गणपुले
तरीही आम्ही सक्खे शेजारी. दोन समांतर रेषा कायम बरोबर धावणाऱ्या


आज प्राध्यापक म्हलाशांसारख्या ऋषी तुल्य विद्वानाचा सत्कार करताना ह्या महाविद्य्लायाचा प्राचार्य आणि त्यंचा जुना सहकारी म्हणून आनंद होतोय इति प्राचार्य बनसोडे
आज माझे सहकारी आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य बनसोडे ह्यांच्या हातून माझा सत्कार होतोय हाच मला मनापासून आनंद होतोय प्राचार्य बनसोडे आणि मी ३५ वर्षाचे सहकारी  आहोत  इति प्राध्यापक .मालशे.
भटाला हा शेवटचा नारळ आता सुटीन ह्याच्या बामणी जाचातून ..बनसोडे
सरकारी तट्टू हे लायकी तरी आहेका ह्याची माझ्या सत्कार समारंभाचे अध्यक्ष व्हायचे पण करणार काय जाता जात नाही ती जात भट पडलोना मी. म्हणून हा प्राचार्य आणि मी मात्र प्राध्यापक .इति प्राध्यापक मालशे
३५ वर्षाचे सहकारी आम्ही दोन समांतर रेषा कायम बरो बर धावणाऱ्या

 अय्या कुंदा तू इति सौ मंदा मळवट  अय्या मंदा तू इति कुमारी कुंदा भागवत

अय्या तुम्ही ओळखता एकमेकीना तिसरी ओळखायला काय झाल आम्ही
जिवलग मैत्रिणी लहान पण पासूनच्या दोघीही एकदम
 अगदी लहानपणी होतीस तशीच आहेस तू स्मार्ट,स्लिम,आणि फिट( नसायला काय झाल पोर बाळ आणि दरोज बदलता नवरा , माझ्याही नवऱ्यावर डोळा होता मेलीचा ) इति मंदा
तू हि अजूनही तशीच साधी सोज्वळ माझ्या लहान पणा पासूनची गोड मैत्रीण (भटणी सारख्या झिपऱ्या
कुरामुर्याच्या पोत्या सारखे शरीर ,शी रौं टन)नवरा मात्र बरा गटावालाय नशीब नाही तर काय कुन्दा 
मैत्रिणी म्हणे जिवाभावाच्या ,तोंडावर प्रेम दाखवले तरी मनातले वैरभाव लपत नाही कैदाशिणीच्या जिवलग मैत्रिणी म्हणे तिसरी दोन समांतर रेषा कायम बरो बर धावणाऱ्या.
 आज माझे मित्र आणि महाराष्ट्रातालेच नव्हे तर आपल्या देशातले नामवंत उद्योगपती श्री गुलाबराव भुसे ह्यांची आपल्या ला वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही ,उद्योग जगतात त्यांना कोण ओळखत नाही (सगळ्यांचे पैसे बुडवणारा एक नंबरचा लुच्चा आणि लबाड )इति उद्योगपती मेहेरचंद खुशालचंद
मेहेरचंद जींच्या हातून हा सन्मान मिळावा हे मी माझे भाग्याच समजतो .(सरकारी दरबारी xxx गिरी कशी करावी हे ह्याच्या कडून शिकावे ,उद्योग पती म्हणे ,ह्याच्या ह्या वयातही चालेल्या उद्य्गाने बायको आणि मुले कंटाळली आहेत )इति उद्योगपती भुसे
दोघेही चोर एक ठग तर दुसरा पेंढारी ..तिसरे उद्योजक दोन समांतर रेषा कायम बरो बर धावणाऱ्या.















शनिवार, ९ जून, २०१२

देवाच्या डायरीतले एक पान

देवाच्या डायरीतले एक पान
निशब्द देवांवर मी चार ओळी लिहून फेस बुक्वर टाकल्या आणि एक निरोप आला कि त्याची" मी माझ्या बापाला रडताना पहिले आहे "हि कविता नक्कीच वाचावी आणि तो निरोप होता एका कवी नाव "सुधीर मुलीक "नावाच्या व्यक्ती कढून,डोळे बंद केले आणि सुधीरचे चित्र डोळ्यासमोर आणायाचा प्रयत्न केला , चित्र आले एका आकाशाचे ,मनापासून मित्रांवर आपल्या आभाळ मायेची सावली धरणाऱ्या एका आकाशाची.एका कवीने आपल्या दुसऱ्या कवी मित्राची आठवण करून देणे हि त्याच्या मोठ्या मनाची अलिखित पावतीच .माणसाच्या मोठेपणाची मोजमाप हि अशीच दिसून येतात.
सुधीरचे प्रोफाईल बघता वाटले कि कोण आहे हा काविकी चित्रकार ,शब्दाचे कुंचले आणि भावनाचे रंग ह्यांचा करामतीवर किती रंगीली बनतात ह्याची काव्य चित्र .
गझल ह्याचा प्राण .गझलेमध्ये दुखाची वेदना शब्दांकित झाली तरच ती गझल.पण ती होतानाही कुठलेही वैश्य भाव मात्र दिसताकामा नयेत हा एक साहित्त्यिक रूढ संकेत.आणि शब्द भाव आणि संकेतांच्या प्रसव वेदानाने जन्माला घातलेली गझल प्रभावी आणि वाचनीय असते. नाही तर नुसती यमके जुळवून गझल होत नाही.तिच्या जन्माच्या वेळेच्या प्रसव वेदनांचे चित्रण शब्दांकित झाले नाही तर ते होते एक बेरंगी चित्र वेदनांचे दुक्खाचे रंग नसलेले.
कुंतीने श्रीकृष्णा दुक्ख मागितले होते आणि दुक्खातच तुझी आठवण येते म्हणून तुझी सतत आठवण यावी म्हणून मला दुक्ख दे अशी तिची आळवणी होती.सुखात माणूस उततो मातातो पण दुक्खात परमेश्वराची आठवण ठेवतो ,आणि दुखाची विराणी सांगणारी गझल माणसाला परमेश्वराच्या समोर विनम्र करते .
दुक्ख कसलेही असो परीघावाराच्या अंतराची किंवा पोटात उडालेल्या वणव्याची सल मात्र ,तेवढीच बोचरी कारण ती सल जाणवून देतो एक गझलकार सुधीर ,र्याच्या शब्दांना फुटलेली दुक्खाच्या निवडुंगाची फुले जास्त बोचरी असतात.
इष्काच्या बाजारातले तू त्याची नव्हतीस कधी आणि तो तुझाही नव्हता कधी असे सांगणारे सत्य ह्याच्या शब्दाने केवळ उघडेच नाही तर चक्क नागडे होते.प्रभावी शब्दांचे हे वस्त्रहरण महाभारत सारखे आठवणीत राहते.
सुधीरची कविता हि पूर्ण कविता आहे कारण ती आमची सर्वांची आहे ,आमच्या दुक्खावर फुंकर घालणारी ,,आमचे दंभ दाखवणारी आणि आमच्या इच्छांना पालवी फोडणारी.
सर्वार्थाने आमचा कोण असतो जो फक्त देतो तो देव,आणि जेव्हा खुदा देतो तेव्हा छप्पर फाडके देतो.सुधीरचे देणे असच आहे फक्त घेणार्याची झोळी मात्र दुबळी असता कामा नये.
देवाच्या डायरीतल्या ह्या पानाला मैत्रायानाच्या शुभेच्छा
शशांक रांगणेकर
मुंबई
९८२१४५८६०२

गुरुवार, ७ जून, २०१२

चिरंजीव प्राजक्त


चिरंजीव प्राजक्त

वाढ़ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ,मराठी कविता तुझी सदैव ऋणी राहिल. तुझी कविता एकणे हा एक रोमान्चकारी अनुभव ,कधी तुझे शब्द आनन्दाचे सोनेरी स्वप्न घेउन येतात तर कधि दुक्खचा वैशाख वणावा,कधि इश्काची गुलाबी स्वपने तर कधि विरहाची काळ रात्र .तु शत प्रतिशत कवि आहेस . भाव आणि शब्द तुज़े कायमचे गुलाम पाहिजे तेव्हा पाहिजे त्या रुपात भावात तुझ्या साथीला ते तयार.
मानवी मनातले कुठ्लेहि भाव तुला अनोळाखी नाहीत ,तुज़े भाव विश्व तु निर्मितोस आमच्या हातला धरुन सफरिला नेतोस ,शब्द आणि भाव इतके प्रभावी कि सोडु म्हणता तरी हात सुटत् नहि. .
पुराण कथेताल्या विश्मित्रानी स्वताहाचे एक जग निर्माण केले होते तु हि तसेच जग तुज्या रसिक श्रोत्यां साठी निर्माण करतोस आत जायचा रस्ता कळतो पण बाहेर पडायाचा रस्ता मात्र दिसत नहि,तुझ्या महिअफिलिच्या बाहेर पड तो तो तुज्या शब्दांच्या रमल खुणाची शाल पांघ रुनच..प्रेक्षकाला बंदिस्त करणारी तुझी कविता . एक इष्टपत्तिच बाँधणरि तरिही मुक्त करणारी,,,तरुणाइ शब्दावर डोलते आणि बुजुर्गायत विचार करते,अशि बहुआयामी कविता ,शब्दात बंदिस्त न होणारी.तुझ्या काव्यापुढे हे शब्द केवळ l अपुरेच. शब्द सम्पत्तिच्या ह्या बेताज बादशाहला द्ययाचे तरी काय
शुभेच्छा आणि शुभेछां शिवाय ,.
शशांक रांगणेकर
९८२१४५८६०२

सोमवार, २८ मे, २०१२

रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी

रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी




नाद स्वर आणि सूर ,शब्द ,परमेश्वरा ने माणसालानव्हे तर संपूर्ण जीव सृष्ठीला दिलेली एक अलोकिक देणगी ,आणि ह्या देणगीची आराधना किंवा उपासना करणारे कलाकार मग ते गायक असोत ,वादक असोत अथवा कवी किंवा चित्रकार ,सर्व परमेश्वराचे प्रेषित ,त्या प्रेषितांचे ह्या भू तलावारचे अस्तित्व हि ईश्वराच्या अस्तित्वाची जिवंत ओळख.नाद ब्राम्हची उपासना हे ईश्वरी उपासनेचे अनन्य रूप .

शब्द आणि सुरांबरोबर ताल नाद नसतील तर तर गायन अगदीच फिके वाटते ,गाण्या बरोबर तबला पेटीची साथ नसणे म्हणजे हळदी कुंकवा शिवायची सवाष्ण .शब्द आणि सुरांबरोबर गाण्यात पेटी आणि तबल्याचे मेहुण पाहिजेच पाहिजे आणि त्रिताल झपताल ह्यांची साथ नसेल तर सगळेच बेचव आणि अळणी.

कोंकण म्हणजे परशुराम भूमी ,तेज आणि रूप ह्याचे मनमोहक चित्रण कोंकण वासीयांच्या चित्रित होतेच.रूप तेज आणि गुणाचे संचित साथीला घेऊन येणारे एक गुणी व्यक्तिमत्व ."प्रसाद विलास पाध्ये

".प्रसाद एक तबला नवाझ आहे .नवाझ म्हणजे राजकुमार ,खरोखर राजकुमाराच सगळ्या गायकांना हवाहवासा वाटणारा,उदार दिलदार आणि आश्वासक. गायकाला साथ करताना स्वतःचे अस्तित्व दाखवत त्याच्या गाण्याला सांभाळणारा एक मित्र.

बऱ्याच वेळेला स्वतःचे मोठेपण गायकांना त्यांच्या कमजोर गायकीच्या कैचीत पकडून दाखवण्याची फार हौस असते पण प्रसाद नावाप्रमाणेच आहे सह कलाकाराला साथ करणारा एक ईश्वरीय प्रसाद भासणारा.मी ह्याला फाडला किंवा भाजून खाल्ला असा कधीही विचार न करणारा .

iit बुद्धिवंत आणि प्रज्ञावंत विध्यार्थ्यांचे माहेर घर.जणू विज्ञान आणि प्रज्ञा साठी साथीने पाणी भरतात.पवई येथील iit मध्ये प्रसाद तबला शिकवतो .कला आणि विज्ञानाचे मनोहर फ्युजन प्रसादने ह्या लहान वयातही अनेक दिग्गज कलाकारांना साथ दिली आहे .

पद्मजा फेणाणी ,अश्विनी भिडे,स्वीकार कट्टी पंडित उल्लाहास बापट ,श्रीरंग भावे सारख्या दिग्गज कलाकारांना साथ दिली आहे.

गुणाचे भांडार ,बोटांवर जणू प्रत्यक्ष शिव शंकराने . दिलेले नाद ब्रम्हाचे वरदान ,आणि रूप तर "रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी असे उद्गार आणणारे ,तरीही चेहऱ्यावर निरहंकारी प्रासादिकता विलसणारे भाव. हे तर खरोखरीचे नाक्षत्रांचेच देणे .

प्रसाद च्या वाल वर त्याचे अनेक फोटो लावलेले आहेत आणि काही निसर्ग चित्र णे हि लावलेली आहेत ,त्यातले एक छायाचित्रण आहे हिमालयातल्या डोंगर दरयांचे,आणि त्या पार्श्वभूमीवर उभारलेला प्रसाद ,मनात विचार बळावतात नाद्ब्राम्हचे रूप हि असेच असेल ना पाठच्या वृक्ष राजी सारखेच उत्तुंग आणि मनोहारी अगदी पाध्यांच्या प्रसाद सारखे.

प्रसाद कोकणचा आहे तिथल्या हापूस सारखाच गोड फक्त गोड नव्हे तर स्वताची एक वेगळीच चव सांगणारा अनोखी आणि आगळी वेगळीच शब्दही अपुरे पडणारी.

त्याच्या तबल्याचा नाद ऐकून म्हणावसे वाटते "आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा तबला वाजवतो "

रूप आणि गुणाचे मनोहारी संचित घेऊन आलेल्या ह्या नादब्रम्ह उपासकाला मैत्रायानाच्या हार्दिक शुभेच्छा

शशांक रांगणेकर



मुंबई ९८२१४५८६०२

गुरुवार, २४ मे, २०१२

चाफ्याच्या सुगंधे मन येईल मोहरून

चाफ्याच्या सुगंधे मन येईल मोहरून
प्राजक्त अंगणीचा वर्षेल मंद धून
त्या प्रमाथी सुरांचे गाईन मी तराणे
सूर शब्द गंध ह्यांचे होई सुरेल गाणे

गाण्यात सूर हे माझे तू शब्द साज गुंफावे
बरसता मेघ हे मनीचे तू इंद्र धनु फुलवावे
सतरंगी इंद्र धनुचा फुलता रंग पिसारा
तनु येईल मोहरून स्पर्शता गंध फुलोरा
 त्या स्पर्शाचे हे गाणे कधीच न संपावे
जन्म जमान्तारीचे हे व्हावे अक्षय गाणे
शशांक रांगणेकर
मुंबई

मंगळवार, २२ मे, २०१२

मुले युद्धावर गेली कि आई वडलांना काय वाटते


रात्र दिवसा आम्हा युद्धाचा प्रसंग ,ह्याचा अनुभव दिवसेंदिवस येतोय ,आम्ह्ही खरोखरच सुखाशी भांडतोय ,दुक्खाशी भांडायचे दिवस दूर गेले आहेत.आता भांडतोय सुखाशी ,
इमारतीचे मजले उंच उंच होताहेत आणि शिस्त ,आणि सावधानी ह्याचीपातळी  मात्र खालावते आहे ,"चालता हैं सब कूच चालता हैं "हि बेफिकिरी मात्र आमच्या समाजाला पोखरते आहे ,,
१९ तारखेला मी आणि माझी पत्नी बोरिवलीला प्रबोधनकार ठाकरे सभागृहात WE4 समूहाने सादर केलेल्या काव्य वाचनाच्या कार्यक्रमाला गेलो होतो.आजचे रविकिरण मंडळ आपल्या कवितांचे सादरीकरण कसे करेल ह्या बद्दल एक मनात उत्सुकता होती.
प्रेक्षागृहाच्या तळ मजल्याशी पोहताच कळले कि लिफ्ट चालत नाही आहे त्यामुळे गिर्यारोहण करूनच प्रेक्षागृहात प्रवेशावे लागले मनात एक विचार आला नो पेन नि गेन "
सभागृहाच्या बाहेर सुहास्य वदनाने उभ्या असलेल्या ललना निमंत्रीताना गजरे आणि चाफ्याची फुले देत होत्या ,काव्यवाचन किती सुगंधी होईल ह्याची एक झुळूकच होती ती .वातानुकुल यंत्रणा बंद असल्यानी भासणारा उष्मा प्रेक्षकांच्या उत्साहाने सुसह्य वाटत होता एकंदरीत उष्मा सुसह्य होता ,पण काम काळ वेगाचे गणित हे असतेच ,कार्यक्रमाला एवढा वेळ का लागतोय ह्याचे कारण कळले तेव्हा मात्र पाया खालची जमीनच हादरल्या सारखी वाटली ,"मंदार आणि समीर असे दोन कलाकार बंद लिफ्ट मध्ये इतर सहप्रवाश्या बरोबर अडकले आहेत त्यांना लिफ्ट मधून काढण्याचे प्रयत्न चालू आहेत. अशी बातमी कानावर आली .
प्रेक्षागृहात अस्वस्ताथा पसरली होती गजरे सुकू लागले होते आणि चाफा जणू बोलेनाच झाला होता .आमची दोन तरुण मुले संकटात अडकली होती ,आमची असहायता आम्हाला उभी जळत होती ,मराठी साहित्य आणि कला क्षेत्रांशी संबंधित बराचश्या व्यक्ती तिथे उपस्थित होत्या ,प्रेक्षागृहाचे कर्मचारी आपल्या प्रयत्नाची शर्थ करीत होते साधारण अर्धा ते पाऊन तास आपत्कालीन परिस्तिथी शी आमची दोन मुले झगडत होती ,"सतत कानात पराभवाच्या दोन ओळी एकू येत होत्या "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा "परदुख शीतल असते म्हणतात पण संवेदिनशील मनाला ते कधीही शीतल नसते .आणि इथे तर आमच्या मुलांना होणारा त्रासाच आम्हाला भेडसावत होता.हताशपणे वांझ सूचना उपसुचानाच्या भडिमारात अवघा प्रेक्षक विव्हळत होता .मी आणि पत्नी एकमेकाच्या जवळच उभे होतो आणि नकळत दोघांचेही हात एकमेकांना घट्ट धरत होते एका अनामिक भीतीने,कळात होते कि जीवन आणि मृत्यूचा मधले अंतर किती लहान आहे ते केवळ एका लिफ्ट च्या जाळी एवढे.
तगमग ह्या शब्दाचा नेमका अर्थ जाणवतच नव्हता तर जाळत हि होता. . आपत्कालीन यंत्रणा पूर्णतः काही वेळ ठप्पझाली होती.
परमेश्वर दयाळू आहे ह्याची खात्री त्यांनीच पटवून दिली आणि कोणाच्याका कोंबड्याच्या ओरडण्याने पहाट झाली आणि लिफ्ट मधली माणसे सुखरूप बाहेर आली कार्यक्रमाला सुरवात झाली .आनंदी आनंद झाला कार्यक्रम छान रंगला पण मनातली भयाची छटा मात्र पुंसली जात नव्हती ,मनात परत परत विचार येत होता लिफ्ट आणि काही वेळ चालू झाली नसती तर ,मन चिंती ते वैरी चिंती म्हणतात हेच खरे झाली होती. जीवन आणि मृत्यू काही श्वासांच्या अंतरावर पाठशिवणीचा खेळ खेळत होते. युद्धावर गेलेल्या मुलांच्या आई वडिलांना काय वाटत असेल त्याचा अनुभव क्षण भर पुरता का होईना आम्हाला आला.

ह्या सर्व घटनांना जवाबदार कोण उत्तर आम्ही स्वतःच ,आमची बेफिकीर वृत्ती ,सब चलता हैं असे म्हणणारी पराभूत मानसिकता ,मला काय त्याचे असे समजणारी गेंड्याची कातडी.
आमची सार्वजनिक नाट्य गृहे आणि त्यांची सुरक्षितता हा प्रश्न्या परत एकदा ऐरणीवर आला आहे ,आपत्कालीन यंत्रणा तिथे काम करते आहे कि नाही हे पाहण्याचे उत्तरदायित्व कोणाचे हे तपासण्याची वेळ आलेली आहे,जर हे असेच चालत राहिले तर बळजबरीचे हौतात्म्य निरपराधांच्या माथी मारले जाईल.
महानगर पालिकेच्या अधिपत्याखाली बरचशी सार्वजनिक उपक्रम आहेत त्या ची सुरक्षितता हि महापालिकेची नैतिक जवबदारी आहे ,शिवसेनेच्या हातात बाळासाहेबांनी भगवा झेंडा दिला आहे आणि तो फडकतो आहे एका काठीवर ती काठी वेळप्रसंगी नाठाळाच्या माथी हाणण्यासाठी आहे.
we चार ह्या मराठी कार्यक्रमाला उडालेले आपत्कालीन यंत्रणेचे धिंडवडे नक्कीच डोळ्यात अंजन घालणारे होते ,त्यामुळे झालेले नुकसान भरून देणे हि महापालिकेची कायदेशीर असेल नसेल पात नैतिक जवाबदारी जरूर आहे,ह्या पापाचे परिमार्जन हा कार्यक्रम महापालिकेने निशुल्क प्रायोजित करून करावे.आणि हे शासक आपले उत्तरदायित्व जाणतात ह्याचे उदाहरण घालून द्यावे.
शशांक रांगणेकर